'थोडा है, थोडे की जरुरत है'
प्रसिध्द चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या चित्रपटांचं एक वैशिष्ट्य असतं. त्यांच्या चित्रपटांतील नायक मरतात खरे पण कुठल्या तरी आकस्मित शक्तीने काही वर्षांनंतर ते पुन्हा येतात आणि खलनायकाचा बदला घेतात. करण - अर्जुन, कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिश असे अनेक चित्रपट आहेत. असाच त्यांचा एक क्रिश- ३ नावाचा सिनेमा आला होता. त्यात विषाणु नावाचा एक प्रकार दाखविण्यात आला होता. सिनेमावाल्यांच्या अचाट कल्पना शक्तीचे कौतुक करावे वाटते. त्या कल्पना नसुन त्या गोष्टी काही कालखंडाने खर्याच होतात. मला वाटतं 'कोई मिल गया' या सिनेमात राकेश रोशन यांनी 'एलियन' म्हणजे परग्रहवासी नावाचा एक प्रकार दाखवला होता. असो. राकेश रोशन यांची आठवण यानिमित्तानं की 'क्रिश- ३' या सिनेमात व्हायरस नावाचा प्रकार होता. आता अशाच एका कोरोना नावाच्या व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. अगदी प्रगत समजल्या जाणार्या राष्ट्रांतील लोक कोंबड्यांसारखे मरत आहेत. या सगळ्या परिस्थीतीचा अंदाज घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांकरिता देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. देशाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होणार हे  माहित असतानाही हा निर्णय घेण्यात आला यामागचे कारण लोकांचा जीव वाचविणे हे आहे. पंतप्रधानांनी देशाला संबोधित करत करत असताना देशवासियांना बाहेर न निघण्याचे कळकळीचे आवाहन केले पण या दोन-तीन दिवसांची परिस्थीती बघितली तर लोक रस्त्यांवर फिरायलाच काय जातात, भाजीबाजारात गर्दीच काय करतात, किराणा दुकानात गर्दीच काय करतात, या सगळ्या वर्तनुकीतुन देशवासिय आपल्याबरोबर दुसर्याच्या मृत्युला आमंत्रण देत आहेत. बाकीच्या देशांत काय परिस्थिती कशी आणि का उद्भवली याचे थेट चित्रण इलेक्ट्रॉनिक मिडिया अगदी घरबसल्या दाखवत आहे तरीसुध्दा लोकांचे डोळे उघडत नाहीत. यावरुन लोकांना या गोष्टीचे काही गांभीर्य नाही असे लक्षात येते. पोलिस प्रशासन व्यवस्था आपल्या परीने काम करत आहेत. न ऐकल्यास लोकांच्या पार्श्वभागावर दंडूके मारण्यास पोलिस मागेपुढे पाहत नाहीत. बेशिस्त समाजाला शि स्त लावण्यासाठी पोलिसांनी काठीचा उपयोग नक्कीच करावा. काही महाभाग पोलिसांवरच हात उचलत आहेत. अहमदनगरमध्ये एक दिवस भाजी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्याठीकाणी कलम १४४ चे उल्लंघन झाले. प्रशासनास सहकार्याची भुमिका लोकांनी घेण्याची गरज आहे . तरच या महाभयंकर महामारीपासुन वाचता येऊ शकते  अन्यथा मृत्यु अटळ आहे. अन्य देशांची झालेली अवस्था पाहता लोकांनी स्वयंशिस्त पाळली नाही तर खुप गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या महाराष्ट्रात कोरोनानं दहशत निर्माण करायला सुरुवात केल्याचं चित्र आहे. दररोज नवीन रुग्नांची भरच पडत आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे. प्रत्येकानं गंभीर होण्याची हीच वेळ आहे. जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोनाने बाधित रुग्णांची संख्या २ लाख ८५ हजाराहून अधिक आहे. यामुळे झालेल्या मृतांचा आकडाही १२ हजाराच्या आसपास गेला आहे. चीनमध्ये ८१,००८ कोरोना बाधित रुग्ण आहेत. असं असलं तरी चीनने तेथील परिस्थिती आता नियंत्रणात आणली आहे असा चीनचा दावा आहे. चीननंतर इटलीत कोरोनानं सर्वाधिक लोकांचा बळी घेतला आहे. इटलीत आतापर्यंत ४७,०२१ कोरोनाचे रुग्ण आहेत. तिथंही लॉकडाऊन करण्यात आला आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये कोरोनानं धुमाकुळ घातला आहे. स्पेन हा युरोपमधील दुसरा असा देश जिथं इटलीनंतर लॉकडाऊन करण्यात आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे.

स्पेनमधील कोरोना रुग्णांची संख्या २४ हजार ९२६ इतकी आहे. युरोपमधील कोरोनाने प्रभावित झालेला आणखी एक देश म्हणजे जर्मनी आहे. तिथही साधारण २० हजार ७०५ रुग्णांची नोंद झाली आहे. इराण नावाचं एक राष्ट्र आहे ते कोरोना रुग्णांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. तेथहीे २० हजार ६१० रुग्ण सापडले आहेत. आणि दिवसांगणिक वाढतच आहेत. पाकिस्तानमध्ये इराणमार्गेच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. युरोपीय युनियननंतर जगातील सर्वात बलाढ्य देश असणारा अमेरिकाही कोरोनापासून वाचू शकलेला नाही याचं भान भारतीय लोकांनी ठेवावं. भारतातील काही खेड्यातील लोक जुगार खेळण्यासाठी कलम १४४ चे उल्लंघन करत आहेत. असो. अमेरिकेत आतापर्यंत १९ हजार ७७७ लोकांना कोरोनाची लागणी झाली आहे. अमेरिकेनंतर फ्रान्समध्येही तशीच परिस्थिती आहे. फ्रान्समध्ये या घडीपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १२,६१२ वर गेली आहे. चीनपासून सुरु झालेल्या कोरोनानं आता इटली आणि स्पेनसह युरोपाला सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीत शुक्रवारपर्यंत सर्वाधिक ४,०३२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. स्पेनमध्येही कोरोनानं १,३२६ रुग्णांचा बळी घेतल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसनं भारतातही मोठ्या प्रमाणात पाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज झपाट्यानं वाढ होत आहे. त्यात सर्वाधिक वाढ ही महाराष्ट्र आणि केरळ राज्यात झाली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये मिळून नव्यानं रुग्णांची भर पडतच आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत कोरोनामुळे देशात काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. सध्या कोरोना व्हायरस हे अवघ्या जगाचा काळ बनुन उभा ठाकला आहे. आता जगासह भारतात आणि आपल्या महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळं प्रशासनाला सहकार्य करावे आणि प्रत्येकानं कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. थोडा संयम भारतीय लोकांनी बाळगला आहे अजुन थोड्या संयमाची खर्या अर्थाने गरज आहे...थोडा है, थोडे की जरुरत है, जिंदगी फिर भी यहां खुबसुरत है.

 




लेखक- दत्ता पवार (मो- ९६५७६०८३३२)

(लेखक हे पत्रकार आणि सामाजिक अभ्यासक आहेत) 



Popular posts
माणुसकीचा आधारवड!
Image
वाढदिवसाचा खर्च टाळून कु.गौरी अनिल लोमटे या विद्यार्थिनीने जय भारती प्रतिष्ठानच्या मोफत जेवण उपक्रमास स्वेच्छेने 2000/- रू केली मदत
आरोग्य सेतु अँप व्दारे शासनाने चालु केलेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हा ----------अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे आवाहन
Image
शेतकरी आत्महत्याग्रस्त व वंचित कुटुंबांना मिळाला आधार ; आधार माणुसकीचा व धागा मैत्रीचा व पेशवा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने
Image
शिधापत्रिका नसलेल्या गोरगरीब कुटुंबाला मोफत राशनचे धान्य वाटप करा- अक्षय भुमकर